Friday, January 31, 2025

Great Teacher…Madhav Mule Sir



आदर्श शिक्षक….माधव मुळे सर 

सकाळी रंजन देशपांडेचा फोन आला. आपले माधव मुळे सर आपल्याला सोडून गेल्याचे त्याने सांगितले. ऐकून मी निःशब्द झालो. चार दिवसांपूर्वीच, प्रजासत्ताक दिना निमित्त, आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या.


शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केल्यानंतर सर काही काळ अबुधाबी येथे अभियंता म्हणुन कार्यरत होते. त्यांनतर ते शासकिय तंत्रनिकेतन जळगांव या संस्थेत अधिव्याख्याता पदावर रुजू झाले.


अत्यंत शांत स्वभावाचे, मृदू व्यक्तिमत्त्वाचे माधव मुळे सर विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रेमाने संवाद साधायचे. त्यांचे विपूल  वाचन होते व त्यांना विविध क्षेत्रातील अनुभव होता. याचा आम्हा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.


World Bank Assistted Project अंतर्गत सरांनी संस्थे करिता DPR बनविला व त्याच्या यशस्वी अंमल बजावणीत सहभाग घेतला. उद्योग व्यवसायांशी समन्वय साधून, प्राध्यापांकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे संस्थेत आयोजन केले. याची दखल घेवून Indian Society for Technical Education ने संस्थेला Faculty Devlopment करिता Narasi Monaji Award देवून गौरविले 


महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळात ‘कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन’ या पदावर कार्यरत असतांना मंडळांतर्गत असलेल्या ९० पेक्षा अधिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळेवर घेवून, निकाल वेळेवर घोषित करण्याकरिता प्रणाली निर्माण करण्या करिता ते अहोरात्र कार्यरत होते. सर या काळात बांद्रा येथील ‘सर जे जे स्कुल ऑफ आर्ट’ येथील हॉस्टेल मधे राहत होते. कामानिनित्त मुंबईला जायचो तेंव्हा आम्ही तेथे राहत असू. विविध विषयांवर ते भरभरून बोलायचे. त्यांना ऐकणे ही एक पर्वणी असायची. MSBTE करिता Rule Book तयार करणे, MSCIT या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करणे, मंडळाला ऑटोनोमी मिळवण्याच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. निवृत झाल्यावरही काही काळ ते OSD म्हणुन मंडळात कार्यरत होते. अत्यंत समर्पित भावनेने ते काम करायचे. 


त्यांची बायपास सर्जरी झाली. थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा तेव्हाढ्याच उत्साहाने ते सर्व कार्यक्रमांत कार्यरत झाले. डॉ. ऑर्निश यांचे ‘Program for Reversal of Heart Disease’ हे पुस्तक विकत घेवून त्यात दिलेल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा त्यांनी अवलंब केला.


शासकिय तंत्रनिकेतन, ठाणे या संथेच्या सुरवातीच्या दिवसांत, संथेच्या प्रगती करिता त्यांनी मोलाचे योगदान दिले.


त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले .


महत्वाच्या प्रशासकिय पदांवर काम करित असतांना देखील, त्यांनी आमच्या आग्रहास्तव Maharashtra Government Polytechnic Teachers’ Association या संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. तंत्रनिकेतनातील शिक्षकांना AICTE वेतनश्रेणी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.


अत्यंत समाधानी आयुष्य ते जगले. निवृत्तीनंतर बराच काळ, ते वर्षातुन सहा महिने अमृताकडे लंडनला, सहा महिने हर्षदाकडे नाशिकला असायचे. ते अत्यंत संवेदनशील व सहृदयी व्यक्ती होते. वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क त्यांनी स्वेच्छेने सोडून दिला होता. आम्हा सर्वांना ते शिक्षक, तत्वचिंतक व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून सदैव मार्गदर्शन करायचे. आज ते सोडून गेलेत तेंव्हा माझ्या व्यक्तिमत्वाचा एक हिस्सा मी कायमचा गमावल्याची भावना मनात आहे!


त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना!


प्रा. महेंद्र इंगळे, पुणे 

३१ जानेवारी,२०२५

Sunday, January 26, 2025

How my students shaped me…

 


How my students shaped me…

In August 1983, I conducted my first lecture on ‘Engineering Drawing’ at SSBT’s College of Engineering and Technology, Jalgaon. 


From the very beginning, I decided not to use any books or notes in the classroom. I was a little tense during the lecture and not in my usual conduct. After 45 minutes, when the bell finally rang, I let out a sigh of relief.  At the same time, I could feel the sense of triumph .


The classroom was filled with both boys and girls, and I could see the respect in their eyes. This made me incredibly joyful and I derived immense satisfaction from the experience. From that day onward, I developed the habit of looking into the eyes of my students. I draw energy and enthusiasm from their sparkling eyes ! This is the greatest gift from my students . It has served as a stepping stone in shaping my identity as a teacher!


Recently, one of my well-wishers, who is a specialised doctor and also an astrologer, offered a lovely compliment about my eyes which truely warmed my heart . It reminded me the poem ‘Let  Not The Eyes Become Old‘ where I reflect on the beauty and power of the eyes. 


I often say that you become a good teacher, if your students are good, a good speaker, if your listeners are good and a good writer, if your readers are good. I have been fortunate to have wonderful students; and my friends tell that I speak well. Now, with your support, I am on my way to becoming a good writer!


Mahendra Ingale @ Jalgaon on 26th January 2025

Saturday, January 25, 2025

Dr. Bharat Amalkar!



*भरतदादा अमळकर यांना डि. लीट. पदवीने सन्मानित करण्यात येत आहे त्या निमित्ताने....*

आमचे मित्र भरतदादा अमळकर यांना दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस साहेब यांच्या हस्ते डी. वाय.पाटील अजिंक्य विद्यापीठ, पुणे यांच्याकडून डि. लीट.पदवी प्रदान करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मी त्यांच्या विषयी माझ्या भावना व्यक्त करीत आहे.

दादांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील रावेर या गावी झाला. आईंना वाचनाची आवड असल्यामुळे त्या लहानपणापासूनच दादांकडून  विविध विषयांवरील पुस्तके  वाचून घेत असत. लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा छंद आहे व वक्तृत्वाची कला अवगत आहे. दादांनी आजपर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे दिलीत परंतु कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत. मनात राष्ट्रप्रेम आणि समाजाविषयीची अपार सहानुभूती या दोन गोष्टींचे मूळ पहिल्यापासूनच रुजलेले होतं.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उच्च यश संपादन करून पुढे आयआयटी किंवा तत्सम मोठ्या चांगल्या पदवीच्या आणि उच्चतंत्र शिक्षणामध्ये जावं यासाठी अंमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळातच त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे बाळकडू मिळाले. विद्यार्थी संघटना, विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक यांच्या कमासाठी झोकून दिलं. पुढे १९८० मधे शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथून स्थापत्त्य अभियांत्रिकी शाखेत पदविका  प्राप्त केली. त्या नंतर त्यांनी वर्ग मित्र श्री. संजय बिर्ला यांच्यासोबत बीटा कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुढे ते एल्. एल. बी. झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करित होते. तंत्रनिकेतनांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात याकरिता त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ४२ दिवसांचा संप केला. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी मिळावी ही त्यापैकी एक मागणी होती. भरत दादांच्या मार्गदर्शना खाली जळगाव येथे १९८५ मधे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.

बांधकाम व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्याच कालावधीत ते धडाडीचे व यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांना परिचित झाले. सचोटीचा पारदर्शक व्यवहार, शब्दाला पक्के,  गुणवत्तेत तडजोड न करता वेळेत प्रकल्प पूर्ण करणे ही त्यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये.

जळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (I M R) या संस्थेची इमारत त्यांनी फक्त शंभर दिवसात बांधून पूर्ण केली. सतत नाविन्यपूर्ण काम करण्याच्या आपल्या पध्दतीने व त्याद्वारे मिळालेल्या अनुभवाच्या आधारे कन्स्ट्रक्शन व्यवसायात चांगल्या  प्रॅक्टिसेस कशा अवलंबता येतील या करिता गवंड्यां पासून ते डिझाईनर पर्यंत सगळ्यांना ते अमूल्य सुचना देत असतात. मोकळा वेळ असेल तेव्हा मित्रांच्या मैफिलीत अनुभव कथन करून व विनोदी किस्से सांगून खेळीमेळीचे वातावरण ठेवतात. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात.

व्यवसायात प्रगती होत होती त्याच बरोबर दादांचे समाज कार्य ही सुरू होते. दादांचे धडाडीचे कार्य बघून केशव स्मृती प्रतिष्ठानचे तेव्हाचे अध्यक्ष  डॉ. अविनाश आचार्य यांनी त्यांच्याकडे केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव म्हणून जबाबदारी सोपवली. आता भरत दादा केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या समूहांतर्गत जळगाव जनता सहकारी बँक, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळा व हायस्कूल, वृद्धाश्रम,अनाथाश्रम, वनवासी कल्याण आश्रम यासारखे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळावर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून दादा कार्यरत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (N E P)च्या अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य म्हणून दादांचे महत्त्वाचे योगदान आहे. राष्ट्रीय शैक्षण धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील पदविका अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करून त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून  सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यातील तंत्रनिकेतनांत औद्योगिक संस्थांचा सहभाग वाढावा, तंत्रनिकेतन व उद्योगधंदे यांमध्ये सामंजस्य असावे व त्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण मिळावे या करिता *हब अँड स्पोक मॉडेल* चा उपयोग करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. श्री भरत दादा जळगाव जिल्हा समितीचे अध्यक्ष आहेत.

व्यवसायात जे लोक त्यांच्याकडे काम करीत होते त्यांनाच भागीदार बनवून त्यांनी व्यवसायाची धुरा पुढील पिढीकडे सोपवलेली आहे व हळूहळू ते व्यवसायातून बाजूला होत आहेत. आपला जास्तीत जास्त वेळ ते आता शैक्षणिक व सामाजिक कार्यास देत आहेत. तल्लख बुद्धिमत्ता व नेतृत्व गुण अंगी असल्याने सभोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन, आपल्या सहकाऱ्यांमधील उत्तम गुण शोधून त्यांना राष्ट्रनिर्मीतीच्या कार्यात जोडून घेण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत.

भरतदादा, मी व माझ्या पत्नी सौ.लता  इंगळे, आम्ही वर्ग मित्र. नंतरही अनेक प्रकल्पांत  आम्ही सोबत काम केले. सार्वजनिक जीवनात सेवाभावी वृत्तीने काम करित असतांना कुठल्याही पदाची किंवा मानसन्मानाची अपेक्षा भरतदादांनी कधीच केली नाही. प्रसिद्धी पासून लांब राहून ते आपले कार्य करीत आहेत. त्यांना डी.लिट.या प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात येत आहे ही आपल्या जळगाववासियांकरिता अभिमानास्पद बाब आहे. 

समाजातील चांगल्या व्यक्तीमत्वांचा शोध घेऊन त्यांचा  गुणगौरव केला जात आहे, त्याबद्दल डी. वाय. पाटील अजिंक्य विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या, पूर्वाश्रमीच्या परिषदेच्या कार्यकर्त्या सौ. हेमाताई अमळकर या खऱ्या अर्थाने भरतदादांच्या सहचारिणी आहेत. त्यांचेही याप्रसंगी हार्दिक अभिनंदन करतो.

शासकीय तंत्रनिकेतन जळगावच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मी भरत दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना सुयश चिंतितो. परमेश्वराच्या कृपेने त्यांच्याकडून अशीच जनसेवा यापुढेही घडत राहो याकरिता त्यांना शुभेच्छा! 

*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*

Shailendra Ingale-Retirement

*शैलेंद्र इंगळे यांच्या सेवापूर्ती निमित्ताने...*

शैलेंद्र इंगळे हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी Hitachi (पूर्वी ची KBX) कंपनीतून सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना येथे व्यक्त करीत आहे.

१९८३ मधे शैलेंद्र जळगाव येथे नव्यानेच सुरू झालेल्या कल्याणी ब्रेक्स कंपनीत रूजू झालेत. १९८७ मधे कंपनीत त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अंतर्गत संघटना- *कल्याणी ब्रेक्स कामगार संघटना*-  स्थापन करण्यात आली. तेव्हा पासून आजपर्यंत संघटने मार्फत कामगार हिताचे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात आलेत. त्यातील कल्याणी ब्रेक्स हौसिंग सोसायटी, कल्याणी ब्रेक्स पतपेढी, कल्याणी ब्रेक्स मित्र मंडळ, एज्युकेशन कमिटी हे काही महत्त्वाचे प्रकल्प. 

कर्मचारी व कुटुंबीयांकरिता विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध ठिकाणी सहली, विमान व बोटींमधून प्रवास, गुणवत्तेत आलेल्या पाल्यांचा गुणगौरव असे विविध उपक्रम राबविल्याने कर्मचाऱ्यांमधे कुटुंबत्वाची भावना निर्माण होऊन कंपनी मधे कार्य संस्कृतीचे निर्माण करण्यात संघटनेला यश आले. कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात संघटना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कंपनी व कामगार यांच्या मधे सामंजस्य असल्याने कंपनीची प्रगती झाली व त्याचा फायदा कामगार व‌ त्यांच्या कुटुंबीयांना झाला व त्यांचे जीवनमान उंचावले.  KBX कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना *गुणवंत कामगार* पुरस्कार देऊन सन्मानित केले. कंपनीने पाचगणी येथील Asia Plateau (M R A Centre) या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण  घेण्याची संधी त्यांना प्राप्त करुन दिली.

दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापना सोबत पगार वाढी संबंधात करार (Agreement) होतात. असे दहा करार त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सामंजस्याने झाले. या बाबीचा कामगार क्षेत्रात गौरवाने उल्लेख केला जातो. त्यांच्या अथक प्रयत्नाने कामगारांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्याचा मोठा निर्णय झाला.

बाबा महाराज सातारकरांची प्रवचने, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आत्मकथन, उमेश कणकवलीकरांचे *मी विजेता होणारच* हे कार्यक्रम, योग प्रशिक्षण शिबिरे, डॉ. रणजीत चव्हाणांची महिलांकरिता आरोग्यविषयक शिबिरे,  महिला दिनानिमित्त तीनशे महिलांचा जैन उद्योग समूहाचे प्रमुख मा. भवरलालजी जैन यांच्या हस्ते *ती व मी* हे आत्मचरित्रपर पुस्तक देऊन सन्मान, युवक व महिलांकरता शासकीय तंत्रनिकेतन जळगावच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम( CDP) अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षणांचे आयोजन असे विविध प्रकल्प आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी राबविले.

बिहारमधील भीषण महापूराने उध्वस्त झालेल्या भागात रोगराई पसरली असतांना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तेथे कुजलेल्या अवस्थेतील प्रेतांची विल्हेवाट लावण्याचे अवघड काम केले. किल्लारी भूकंपात तेथे राहून भूकंपग्रस्तांना औषधे व जेवण पुरविण्याचे काम केले. कंपनीतील व परिसरातील अनेक कोरोनाग्रस्त  रुग्णांना वेळीच औषध उपचार  व हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांना बाहेर काढले. मराठा उद्योजक विकास मंडळ, जळगांवचे जेष्ठ समन्वयक या नात्याने समाजातील शेतकरी व शेतमजुर यांच्या मुलामुलींकरिता सामुहिक विवाह सोहळ्यांच्या आयोजनात मोलाची कामगिरी पार पाडली. धुळे येथील मराठा मंडळाकडून माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते *समाज भूषण* पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

सौ. ज्योतीताई इंगळे जळगाव महानगरपालिकेत दहा वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत असताना विशेषतः प्रभाग सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सभापती अशा विविध पदांवर कार्यरत असताना अनेक संवेदनशील व महत्वाचे निर्णय घेण्यात सौ.ज्योतीताईंना त्यांची मदत झाली. यात प्रशासनाने सेवेतून निलंबित केलेल्या ३४ जणांना पुन्हा सेवेत घेणे, आव्हाणे येथे प्रस्तावित कत्तलखाना दुसरीकडे हलविणे, जळगाव शहराकरिता पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेस मंजुरी देणे असे महत्वाचे निर्णय आहेत. हे सर्व त्यांनी कंपनीचे काम सांभाळून केले.

शांत व संयमी स्वभाव, सहकाऱ्यांना सोबत घेऊन व त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकून त्यांच्या मदतीने प्रकल्प राबविणे, शिस्तप्रियता व काटेकोरपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये.

त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात समर्पित भावनेने काम करणारे श्री. के एम बापू पाटील यांच्या सारखे जीवा भावाचे सहकारी त्यांना लाभले. पत्नी सौ.ज्योतीताई, भावना व प्रतिक ही मुले तसेच सर्व कुटुंबियांची खंबीर साथ त्यांना लाभली. श्री. बाबासाहेब कल्याणी, कंपनीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी श्री. सतीश शेखरी व सध्याचे श्री. अनिल खांडेकर साहेब, आंतरराष्ट्रीय कामगार संघटने (I L O) सोबत काम करणारे श्री. श्रुती साहेब यांचे विविध प्रकल्प राबविण्याच्या कामी त्यांना मार्गदर्शन लाभले.

कामगार बांधवांनी विश्वास दाखवून त्यांना भक्कम साथ दिली त्याबद्दल त्यांचे  मी आमच्या कुटुंबिंयांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो.

शैलेंद्र कंपनीच्या सेवेतून निवृत्त होत आहेत परंतु सार्वजनिक जीवनातून त्यांना लोक निवृत्त होऊन देणार नाहीत. आमचे बाबा विश्वनाथभाऊ इंगळे यांचे कडून त्यांना जनसेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक संघटनांत ते कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातही त्यांचे काम आहे. आमच्या चांगदेव गावातील श्री. एस.बी.चौधरी हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी असून आता ते संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

या पुढेही त्यांच्या कडून अशीच जनसेवा घडत राहो या करिता त्यांना भरभरून शुभेच्छा व अनेक आशिर्वाद!

*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*

Friday, January 24, 2025

Data… Information…Knowledge…Wisdom



Data…Information…Knowledge…Wisdom!

T S Elliot’s ‘The Rock’ is a dramatic poem which talks about spirituality, faith and the challenges faced by modern civilisation. 

In his poem he asks : 

Where is the wisdom we have lost in knowledge? 

Where is the knowledge we have lost in information? 

I would extend this thought : 

And, where is the information ? 

We have lost it in data. 

We know- When data is processed, it becomes information. When information is further processed it becomes knowledge. When knowledge is applied in judicial manner to solve problems and make human life comfortable…it is wisdom. 

When the data exists in heaps of piles, and if it is biased or corrupted, would you be really able to transform it into information?

Mahendra Ingale @ Jalgaon in January, 2025

Sunday, January 19, 2025

Keep It Up!



Keep It Up !

Nowadays, I write a blog on various subjects related to my experiences. I am very grateful to my readers and often respond to them as a goodwill gesture. Recently one of my well-wishers appreciated my blog saying ‘Keep it up’. I thanked him at that moment.


While reading the inspiring poem by Rabindranath Tagore, ‘Where the mind is without fear and the head is held high…’, from his Nobel-winning collection of poems, Gitanjali, the words ’Keep It Up’ replayed in my mind.


Keeping it up is not, always, so easy. But the benefits of keeping it up are significant. It fosters self-respect, dignity, and a positive self image. It helps us navigate life with less stress and fear, earning respect from others and setting a good example for our children.


‘Keeping it up’ keeps your posture straight having significant impact on both health and longevity!


During my time at Government , Polytechnic, Jalgaon, I always tried to walk straight, keeping my back straight and head high, through the 500-foot corridor!


Mahendra Ingale, Pune

January, 2025

Thursday, January 16, 2025

Let Not The Eyes Become Old!




Yesterday, I was reading and listening to the audiobook ’The Old Man and the Sea’ by Nobel Laureate, Ernest Hemingway. It tells the story of an old fisherman who, despite his age retains a lively spirit and an undaunted outlook, demonstrating human dignity. I came across a heart-touching line : ‘Everything about him was old except his eyes…’. I paused there because the line was so powerful and resonated deeply with me. For the entire day, it kept replaying in my mind. At the end of day, when I pray and, commit myself : ‘Let not the eyes become old’, I get filled with immense joy!

Let Not The Eyes Become Old!

Eyes!

Are they just part of bodies?

Are they required to see dreams, and to hold vision clear ?

If they are not old, how then are they?

Are they young, vibrant, ever wise?

See with wonder, and gaze with cheer 

Let innocence remain ever near!

Through every joy, each story told 

Let not the eyes become old!

Eyes of students and eyes of teachers 

Eyes of friends and eyes of colleagues 

Eyes of parents and eyes of children 

Let not the eyes become old!

Mahendra Ingale, Pune.  January, 2025

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...