Thursday, August 27, 2026

Value-Based Leadership: Engineering Dreams Inspiring Souls- A Book Review

Value-Based Leadership: Engineering Dreams Inspiring Souls- A Book Review

I extend my heartfelt gratitude to Prof. Dr. Badrilal Gupta, Indore Institute of Science and Technology, and former Professor of Management at NITTTR, Bhopal, for graciously devoting his valuable time to read Value‑Based Leadership with such depth, for penning a thoughtful review, and for publishing it in the esteemed Journal of Education Psychometrics and Bibliometrics Studies (JEPSY), ISSN(E): 3139‑308X, Vol. 01, No. 02 (2026), pp. 135‑137, July 17, 2026.

His words are of immense importance to me, and I believe they will guide keen readers as well as researchers in the field of leadership:

“The author has defined leadership and values in the prologue itself, stating that leadership is for purpose, and values are for a compass. The book connects the reader with different chapters and compels him/her to reflect on his/her own journey of leadership and followership. 

The message of the book is crystal clear: Lead with integrity, Serve with humility, and use wisdom to live beyond success

In the frameworks within, the analogy used on ‘Decision Making with Intuition Integrated with Prayer’ and ‘The Compass‑Tree Framework for Value‑Based Leadership’ clarifies the message of the book.

The book encompasses the existing concepts and theories of leadership to build further ideas on value based leadership. 

The book is heart-touching on the role and values of a leader. It is a compendium of many theories, autobiographies, stories, and experiences of authors' journeys as value-based leadership. 

I recommend that the message of the book should be transformed into leading people in all walks of life, be it social, religious, production, service, political, environmental and so on.”

His scholarly engagement has illuminated the work and bestowed profound value upon its journey. I remain deeply grateful for this contribution.

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 28, 2026 Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedADRAndCounsellingServices

Friday, August 14, 2026

स्वातंत्र्य!

 स्वातंत्र्य!  

जगावे ते स्वातंत्र्यासाठी,

आणि मरावे तेही स्वातंत्र्यासाठी—

असे हे शाश्वत मूल्य !

१५ ऑगस्ट—

प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान जागवणारा दिवस!

आजचा दिवस आहे त्या असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाचा,

ज्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले, प्राणांची आहुती दिली.

त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य!

ते जपणे, उन्नत करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी.

या मंगलदिनी, त्या शूर वीरांना वंदन करून,

त्यांच्या आदर्शांना अनुसरून,

स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहू या!

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!  

आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dr Mahendra Ingale @Pune on Aug 15, 2026

Author of Value Based Leadership

# EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

Tuesday, August 11, 2026

Democracy: Erosion from Above and Below

Democracy: Erosion from Above and Below

Democracy is like a glass — transparent and beautiful, but vulnerable to cracks. 

Democracy is also  like a bamboo — it bends under pressure but does not break, regaining its upright form once the storm passes.

Larry M. Bartels, in his book ‘Democracy Erodes from the Top’ (Princeton University Press, 2023), argues that the real crisis of democracy in Europe stems not from ordinary citizens but from political leaders. 

His findings emphasize:  

‘Leaders, not citizens, drive erosion. Elites exploit institutions, laws, and surveillance to entrench themselves in power.

Europeans broadly value democracy, integration, and institutions. 

Populist sentiment has always existed, but its electoral impact is modest.’

Bartels concludes that democratic decline is essentially a top-down phenomenon, rooted in elite manipulation rather than grassroots rejection.

While Bartels highlights erosion from above, democracy also erodes from below:

Materialism and distraction: In capitalist societies, citizens are absorbed by consumerism, advertisements, and digital platforms.

Neglect of values: People rarely imbibe democratic values unless consciously trained or compelled.

Cycle of erosion: As citizens disengage, leaders face less resistance, enabling further manipulation.

Democracy does not erode only from the top. It also weakens from the bottom, simultaneously. The process is cyclical:

Top-down erosion: Leaders manipulate institutions to consolidate power.

Bottom-up erosion: Citizens, distracted by materialism, neglect values and disengage.

Restoration by the people: History shows that when democracy is suppressed, it is ultimately the people — through their numbers in protests, resistance, criticism, and digital presence — who restore it. 

When democracy reaches its lowest point, the collective strength of the people — their sheer number — becomes decisive. 

Governments may wield surveillance, economic tools, and laws, but they cannot ultimately suppress the awakening of the masses.

Reflection:

Democracy is fragile in its practice yet resilient in its essence.

 Bartels rightly identifies the dangers of elite manipulation, but erosion is not confined to the summit of power. It also begins at the grassroots, where citizens neglect values in pursuit of material gain. 

Ultimately, democracy survives because the people — through their numbers, their resistance, and their will — reclaim it when it falters. 

Like glass, democracy must be protected; like bamboo, it endures and rises again.

Dr Mahendra Ingale @ Jalgaon on Aug  11, 2026

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #FragileDemocracy #ResilientDemocracy #DemocracyErodes

Sunday, August 9, 2026

इतिहास घडविणारे शब्द !

 इतिहास घडविणारे शब्द !

कल मैं आपके घर आऊँगाहे वाक्य संवादकलेचं उत्तम दर्शन घडवतं. एका वाक्यातील वेगवेगळ्या शब्दांवर दिलेला जोर (emphasis) अर्थाला नवे रंग देतो.

शब्दांवर जोर दिल्याने बदलणारे अर्थ:

  • कल : कल या शब्दावर जोर दिल्यानंतर थोडा पॉज घेवून वाक्य उच्यारल्यास त्याचा अर्थ – उद्या येईन, आज नाही. किंवा अनेकदा टाळल्यानंतर उद्या नक्की येईन.असा होतो. याप्रमाणे इतर शब्दांवर जोर दिल्यास त्याप्रमाणे अर्थ बदलतो.
  • मै : मी स्वतः येईन, सहकाऱ्यांना पाठवणार नाही.
  • आपके : तुमच्याकडेच येईन, दुसऱ्या कुणाकडे नाही.
  • घर : तुमच्या घरी येईन, ऑफिस किंवा इतर ठिकाणी नाही.
  • आऊँगा : निश्चित येईन, शंका नाही.

संवादकलेतील महत्त्व:

संवादकलेत शब्द आणि त्यावर दिलेला जोर हा ही महत्त्वाचा ठरतो. बोलणाऱ्याने कुठल्या शब्दावर जोर दिला यावरून त्याचा खरा हेतू समजतो. विशिष्ट पद्धतीने शब्द उच्चारुन भावनिक जवळीक साधता येते, ऐकणाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करता येतो.

संवादकला शिकता येते आणि भाषण कौशल्य संपादित करता येते.  डेल कारनेगी यांनी How to Win Friends and Influence People सारख्या पुस्तकांत संवादकलेचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी दाखवून दिले की योग्य शब्द, योग्य प्रसंग, आणि प्रामाणिकता यांचा संगम झाल्यास संवाद लोकांच्या मनात अमिट ठसा उमटवतो, आणि त्याद्वारे योग्य तो परिणाम साधला जातो.

आधुनिक काळातील भाषणकला :

आजच्या काळात लोकांच्या भावनांना हात घालून, त्यांना स्वप्ने दाखवून, त्यांच्या आशा अकांक्षा जागृत करून भाषणे कशी करायची याचे मार्गदर्शन करणाऱ्या Consulting Agencies आणि PR Firms निर्माण झाल्या आहेत.

या कंपन्या नेत्यांना भाषणकौशल्य शिकवतात. भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून त्यात भाषणे कशी करायची, LCD Projector सारख्या  संसाधानांचा वापर करून, AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून  प्रेझेंटेशन कसे करायचे याचे मार्गदर्शन करतात. Digital Platforms वरुन त्याची  मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करतात. हजारो कोटी कमावून, काही Cosulting Firm चे प्रमुख स्वतःच नेते बनले आहेत.

पण अशी भाषणे अनेकदा फुगविलेला फुगा ठरतात. टाचणी लागली तर फुगा क्षणात फुटतो किंवा कालांतराने त्यातील हवा निघून जाते. कारण त्यात खरी तळमळ, प्रामाणिकता आणि समाजपरिवर्तनाची ताकद नसते.

उद्दिष्टाशी प्रामाणिक राहून, ज्यांनी संघर्ष केला, किंमत मोजली त्या नेत्यांची भाषणे इतिहासात अजरामर झाली.

इतिहासातील अजरामर भाषणे:

मार्टिन ल्यूथर किंग :

२८ ऑगस्ट १९६३ रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील Lincoln Memorial समोर डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेले हे भाषण ‘I Have a Dream’  म्हणून अजरामर झाले. या भाषणात त्यांनी पुनरावृत्तीचा वापर केला. नद्या, डोंगर, टेकड्या यांचा उल्लेख करून त्यांनी स्वातंत्र्याचा निसर्गाशी संबंध जोडला. वर्णभेदमुक्त, न्याय्य समाजाचे स्वप्न श्रोत्यांसमोर उभे केले. Freedom will ring या शब्दांनी त्यांनी स्वातंत्र्याचा नाद संपूर्ण अमेरिकेत घुमवला. हे भाषण अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रतीक ठरले;  हे भाषण नियोजनपूर्वक तयार केले गेले होते, पण त्यातील भावनिक लाट श्रोत्यांना थेट भिडली.

महात्मा गांधी :

 ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गावलिया टॅंक येथून, महात्मा गांधी यांनी Do or Die ही घोषणा करून, या स्वातंत्र्य लढ्यात भारत देशाला स्वातंत्र्य तरी मिळवू किंवा त्या प्रयत्नात मरू तरी असा संकल्प केला. या भाषणानंतर गांधीजीना अटक झाली तरीही तो संदेश देशभर पसरला आणि स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक गती मिळाली.

Quit India भाषणात Do or Die ही घोषणा आधीच ठरवली होती. अहिंसा व सत्याग्रह यावर आधारित संघर्षाचे आवाहन त्यांनी नियोजनपूर्वक केले. तरीही त्यातील तळमळ जनतेच्या मनात ज्वाला पेटवणारी ठरली.

लोकमान्य टिळक :

१९०६ मध्ये, ब्रिटिश सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अटक केली. न्यायालयात खटला सुरू असतांना,  युक्तिवादात, लोकमान्य टिळकांनी  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही घोषणा केली. न्यायालयात त्यांनी स्वराज्याचा हक्क अधोरेखित केला. या वाक्याने भारतीय जनतेला स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणा दिली. न्यायालयाने त्याना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि त्यांची रवानगी मंडालेच्या  तुरंगात करण्यात आली. पण त्यांचे हे वाक्य भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे घोषवाक्य बनले. जनतेसाठी प्रेरणादायी मंत्र ठरले. त्यातून जनतेला आत्मविश्वास आणि धैर्य मिळाले. स्वराज्याची मागणी ही केवळ राजकीय घोषणा नव्हती, तर ती जनतेच्या मनातील आकांक्षा होती. पुढील स्वातंत्र्यलढ्याला यामुळे निर्णायक गती मिळाली.

विन्स्टन चर्चिल :

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनसाठी विन्स्टन चर्चिल यांची भाषणे  राष्ट्राला संकटात उभारी देणारी ठरली. त्यांच्या संवादकलेत प्रामाणिकता, धैर्य आणि प्रेरणा यांचा संगम होता.

१३ मे १९४० रोजी पंतप्रधान झाल्यानंतर चर्चिल यांनी संसदेत पहिले भाषण दिले. त्यात त्यांनी म्हटले— I have nothing to offer but blood, toil, tears and sweat. या वाक्यात त्यांनी जनतेला कठीण वास्तव स्वीकारायला भाग पाडले. युद्ध दीर्घकाळ चालेल, त्यात बलिदान द्यावे लागेल, पण शेवटी विजय मिळेल—हा संदेश त्यांनी दिला. हे भाषण प्रामाणिकतेचे प्रतीक ठरले. लोकांना खोटे आश्वासन न देता त्यांनी संघर्षासाठी तयार केले.

४ जून १९४० रोजी Dunkirk मधून ब्रिटिश सैनिकांची सुटका झाल्यानंतर चर्चिल यांनी संसदेत भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले— We shall fight on the beaches We shall never surrender. या वाक्यात त्यांनी जनतेला धैर्य दिले. संकटाच्या काळात ब्रिटिश जनतेला आत्मविश्वास परत मिळवून दिला. हे भाषण जिद्दीचे प्रतीक ठरले.

समारोप:

संवादकला ही शिकता येते, भाषणकौशल्य प्राप्त करता येते. पण इतिहासात अजरामर ठरतात तीच भाषणे जी मानवी आयुष्य बदलतात, समाजाला दिशा देतात आणि पिढ्या न पिढ्या प्रेरणा देतात.

टिळकांचे न्यायालयातील उदगार, गांधींचे Do or Die, चर्चिलचे Blood, Toil, Tears and Sweat आणि मार्टिन ल्यूथर किंग यांचे I Have a Dreamहे शब्द आजही जिवंत आहेत.

या शब्दांनी परिवर्तनाची बीजे रोवली, त्यांनी इतिहास घडविला!

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 9, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

 

 

 

 

Thursday, August 6, 2026

मृत्यू पत्र : सजगतेचा दस्तऐवज !

 मृत्यू पत्र : सजगतेचा दस्तऐवज !

माणसाचे मन केवळ भूतकळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही तर त्याला भविष्याच्या गरुडपंखांचे वरदानही लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणे, ते फुलावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतील आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते भंग पावले तरी त्याच्या रक्ताळलेल्या तुकड्यांवरुन इतर स्वप्नांच्या मागून धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे आणि माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच !’

-अमृतवेल, वि स खांडेकर

स्वप्न बघणे, शिक्षण घेणे, पद-प्रतिष्ठा प्राप्त करणे त्याकरिता अहोरात्र मेहनत करणे, संघर्ष करणे, संपत्ती मिळवणे आणि कर्तृत्व सिद्ध करणे हा मानवी आयुष्याचा पट आहे. जीवन आहे तो पर्यंत संघर्ष आहे. आशा-आकांक्षांच्या पूर्तिकरता शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणे यात काही गैर नाही. पण जीवन म्हणजे एक भातुकलीचा खेळ हे भान ठेवणेही आवश्यक आहे. हा खेळ अहमहकिने खेळला जातो. आपण अर्जित केलेली संपत्ती, संपादित केलेली मालमत्ता, उभारलेला व्यवसाय ही या खेळातील खेळणी आहेत. शेवटी ती दुसऱ्यांच्या हाती सोपवायची आहे याचे भान मृत्यूपत्र देते. यात आपण ठरवतो की कोणत्या खेळण्याचा वारसा कोणाला मिळावा. उद्या जावे लागेल हा विचार ठेवला तर जीवन अधिक परिपूर्ण होते. मृत्यूचे भान ठेवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भरभरून जगतो.

भारतामध्ये संपत्ती वाटपाचे प्रचलित कायदे आहेत, पण ते अनेकदा गुंतागुंतीचे ठरतात. आपण अर्जित केलेल्या संपत्तीने कौटुंबिक कलह निर्माण होण्याचे टाळायचे असतील तर मृत्यूपत्र आवश्यक आहे. मृत्यू पत्र म्हणजेच ईच्छापत्र. ज्यांना मृत्यूची भीती वाटते त्यांच्या करिता हा शब्द अधिक सोयीचा आहे. मृत्यूविषयीची भीती कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. झोपताना नियमित शवासन करणे हा त्यापैकी एक. मृत्यूपत्र लिहिणे म्हणजे मृत्यूला स्वीकारणे, त्याला घाबरणे नाही.

हयातीत संपत्तीचे वाटप करणे  आणि मृत्यू पत्राद्वारे ते करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय पुढच्या पिढीकडे पूर्णपणे सोपविला जाऊ शकतो, कारण त्यात सातत्य आणि विकास आवश्यक असतो. पण संपत्तीचे हयातीत वाटप करताना जर आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आली, तर व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, ‘नटसम्राटसारखी अवस्थ होण्याची भीती असते. म्हणूनच व्यवसाय हस्तांतरित करणे योग्य, पण संपत्तीचे वाटप मृत्यूपत्राद्वारे करणे अधिक शहाणपणाचे ठरते.

आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहचल्यावर मृत्यूपत्र करून ठेवावे. दुसऱ्या टप्प्यावर, परिस्थिती बदलली तर ते पुन्हा नव्याने करता येते. मृत्यूपत्र लिहल्याने, ज्यांनी आपल्यावर जिवापाड प्रेम केले, ज्यांच्यामुळे जीवनात आनंदाचे क्षण निर्माण झाले, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.  

मृत्यूपत्राने संपत्तीचे सुस्पष्ट वाटप करता येते. कुटुंबातील वादविवाद टाळता येतात. परदेशात राहणाऱ्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळते. मृत्यूपत्र कर्तृत्वाचा सन्मान करते. कुटुंबाला शांती मिळवून देते.

मृत्यू पत्र हे केवळ संपत्तीचे वाटप नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याला सजगतेने सामोरे जाण्याची तयारी आहे. ते आपल्याला शिकवते की मृत्यूचे भान ठेवून जगणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भरभरून जगतो.

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 6, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedADRAndCounsellingServices

Tuesday, August 4, 2026

भाव विश्वातील जग !

 भाव विश्वातील जग !

 हे शहर चांगले होते,

आताही आहे,

पूर्वी जास्त चांगले होते.


येथे चांगली माणसे राहत होती,

आताही राहतात,

काही जाऊन, काही येऊन राहतात.


पूर्वी मोजकेच विषय असायचे चर्चेला,

आताही असतात,

पण आता ते पूर्वीपेक्षा खूप जास्त असतात.

 

हे शहर आता शहर राहिले नाही,

ते छोटे जग झाले आहे.

 

गाव-पाड्यांतून आलेले लोक शहरी झाले,

आणि शहरी लोक जागतिक झाले.

 

जागतिक सोयी सुविधा नसल्या आल्या वाट्याला,

तरी काही भावविश्वाने जागतिक झाले,

काही आचार विचाराने जागतिक झाले.

 

आता येथील लोक गाव-गाड्यांविषयी बोलत नाहीत,

शहराविषयीही बोलत नाहीत,

ते बोलतात जगाविषयी.

 

जगाच्या समस्यांत गुंतून,

त्यांना आपल्या समस्यांचा विसर पडतो,

त्या विसरातच त्यांना शांतीचा क्षण सापडतो.

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 4, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

Monday, August 3, 2026

सत्तेचा देखावा!

 सत्तेचा देखावा!

सत्ता स्थानावर, अधिकार पदावर असताना,

सत्ता, अधिकार हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे...

आम्हाला राजकीय वारसा आहे...

आमच्या पाच पिढ्या शासनात, प्रशासनात अधिकार पदावर कार्यरत होत्या ...

या भावनेने काही

तर देशाच्या सर्वोच्च निवड संस्थांनी आमची निवड केली आहे

या भावनेने काही

सत्तास्थानी असताना,

सेवेकरिता सत्ता हा दिखावा करत राहिले!

 

आभासी जगात आभासी आनंद,

आणि जास्त आभासी जगात जास्त आभासी आनंद,

 हा ही देखावा त्यांनी मांडला,

पण तो उत्सवांत मांडायचा देखावाच ठरला!

 

आपल्या कार्य काळात,

स्वतःशी प्रामाणिक न राहता,

घेतलेल्या निर्णयांचे समर्थन करण्याकरिता,

सत्ता गेली तेव्हा 

काहींनी आत्मचरित्रे लिहली,

काहींनी पॉडकास्ट केले!

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 3, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

 

Value-Based Leadership: Engineering Dreams Inspiring Souls- A Book Review

Value-Based Leadership : Engineering Dreams Inspiring Souls- A Book Review I extend my heartfelt gratitude to Prof. Dr. Badrilal Gupta, Indo...