Wednesday, July 30, 2025

Service, Not Demonstration !

Power, at its core, is not mere possession; it is a vital potential. It stands as one of the key psychological needs embedded in human nature: the instinct to acquire, retain, and demonstrate control. When used wisely, it fuels change, enables progress, and gives momentum to noble intentions. Without power, even the most compassionate ideas may remain dormant. It is essential for implementing welfare programs, solving societal problems, and reshaping communities for the better.

Yet, power is never solitary. It is acquired through engagement, through politics that influence people.  And at the heart of that influence lies authentic leadership. I’ve come to express this interconnection through a guiding quote:

To implement any welfare program or bring change in a social or political organisation, power is required. Power is acquired by doing politics. Politics is done by influencing people. People are influenced by leaders who understand their psychology and promise the fulfillment of their needs.

This insight grew out of a rich journey spanning decades of reflection, education, and experience. Over twenty years ago, I had the privilege of coordinating a statewide training program on ‘Institutional Management’ for engineering educators in Maharashtra. Among its sessions, one of mine; 'Power, Politics, and Influence’, proved unforgettable. Drawing from my family background, and having passion for leadership, I delivered this session with thoughtfulness, real-life anecdotes, and just the right touch of humour. Even today, many participants recall it with fondness. And for me, it remains a milestone!

This foundation helped me further articulate leadership as a moral and practical force. I often say:

A leader is a person who shoulders responsibility, who is sensitive to the environment, and puts earnest efforts to solve problems.

Leadership, in this sense, is a form of service. But through this journey, one cautionary truth has always stood clear: Power demands demonstration. Many who possess power feel compelled to assert it—sometimes coercively—to prove their strength. In doing so, they may invite their own undoing. Power, when stripped of purpose, becomes perilous. Power, when wielded without wisdom, can corrode the soul of leadership.

Yet human nature holds another deeper need; Self-Actualisation.’  This is the pursuit of inner fulfilment.  When this need is genuinely met, it tends to quieten the craving for power and its outward display. Even when entrusted with great authority, such individuals choose service over dominance. They use power not to impress, but to uplift.

In recent years, as my reflections evolved into blogs and a book I authored; I embraced creativity in newer forms; transforming quotes and thoughts into short social media reels. With visuals, music, and emotional storytelling, these reached younger audiences and sparked fresh engagement. The process itself was exhilarating; teaching me new tools, inviting new voices, and awakening the spirit of innovation I always sought to nurture in my students.

Throughout my journey as an educator, I have always encouraged learners to be imaginative, expressive, and rooted in purpose. Today, I live that philosophy anew; infusing wisdom with creativity, and creativity with compassion.

Because in the end, power is not for display. It is for direction. And leadership, at its best, is a luminous act of service !

 

 

 

 

 

 

 

 

 

Monday, July 28, 2025

Write your autobiography, if you truly believe you are a great man

I promise myself each morning: “Today, I’ll read my favourite books. No blogging!”

But as I walk on the track,  in the morning sunshine, new thoughts pop into my mind.  My inner voice persuades me to write. That silent commitment is postponed to tomorrow.

Why does this happen? Maybe because I sleep listening to Carl Jung, Paramhansa Yogananda, Osho, G. A. Kulkarni. Their words don’t just speak to me, they awaken me.

Today’s idea was profound:
“Write your autobiography, if you truly believe you are a great man.”

It struck me deeply. We often hesitate to speak about ourselves. Why? We fear being judged as boastful or ego-driven. But expressing oneself is a human need, unless you've reached that rare state of  'Self-actualisation' where silence alone feels complete.

So I say:
Don’t suppress your truth. Share your story, when the time is right and when people are ready to listen. And if you write with honesty, you’ll find immense joy. Writing is not just about sharing. It’s about liberating the soul.

You’ve served with commitment. You’ve walked the hard path. Now that you have achieved most of the goals, walk the bright one, guided by your soul. And once you begin, you’ll realize you’re not alone. There are many, walking on this path. Share with them. Celebrate with them.

I haven’t written an autobiography yet, but perhaps, I’ve begun with something Autobiography-like!

So here are the words that spring from the soul, and flow like waterfall!

Let us dance in that eternal energy!


Saturday, July 26, 2025

Transcedence, Self Esteem, and Creative Leadership

Transcendence, Self-Esteem, and Creative Leadership

Today, as I immersed myself in Transcendence: My Spiritual Experiences with Pramukh Swamiji by Dr. A.P.J. Abdul Kalam and Arun Tiwari, I found myself drawn once again to the idea of writing a blog. This book—gifted to me by my dear friend and colleague, Dr. Suresh Yawalkar—is more than a literary work. It is a bridge between science and spirituality, between leadership and humility.

Dr. Yawalkar and share a common alma mater- Sardar Patel College of Engineering, Mumbai. I have witnessed his journey as a man of quiet strength and unwavering self-esteem. Throughout his distinguished career- as Lecturer, Head of Department and Joint Director -he served the Technical Education Department of Maharashtra with dedication and distinction. His contributions during the World Bank Assisted Project in the 1990s were transformative. As Deputy Secretary of the Maharashtra Board of Technical Education, Mumbai, he spearheaded reforms that reshaped the system. His visit to Canada as a part of official delegation was not merely a professionally mile stone, but a reflection of his commitment to fostering collaboration and strengthening ties with Canadian counterparts.

What makes Dr. Yawalkar’s journey even more profound is his spiritual grounding. A devoted disciple of the Swaminarayan Sampradaya, he embodies the values of service, discipline, and inner clarity. His life reminds me that true leadership is not about titles—it’s about the quiet impact we leave on systems, institutions, and people.

Reading Transcendence, I felt a deep resonance with Kalam’s reflections on Pramukh Swamiji. The fusion of science and spirituality, the emphasis on honour and creative leadership, and the call to live with purpose—all these themes echo in the lives of people like Dr. Yawalkar. Because of such friends, I have been fortunate to experience and learn across diverse domains—technical, philosophical, and spiritual.

Two quotes from the Book’s section on ‘Evolution of Creative Leadership’ stirred something deep within me:

‘Your vision will become clear only when you look into your own heart. Who looks outside, dreams; who looks inside, awakes.’

-Karl Jung 

A leader is best when people barely know he exists, when his work is done, his aim fulfilled, they will say: We did it ourselves.’

Lao Tzu

These words invite introspection. They remind me that authentic leadership is not about visibility, but enabling others to shine. They will serve as guiding lights as I write my next book-one that explores how government officers can uphold self esteem, honour, and dignity while serving society.



Wednesday, July 23, 2025

मैत्रीचा सोहळा!

 मैत्रीचा सोहळा!

चांगले मित्र मिळाले ही ही परमेश्वरचीच कृपा!

चार महिने पुस्तक लेखन आणि प्रकाशन यात व्यस्त असल्याने पुण्याला होतो. त्यांनतर आज प्रथमच मित्रांशी भेट झाली.

१९७८ पासूनच्या सहप्रवासात,  हास्य विनोद, विचारांचे आदान प्रदान, कठीण प्रसंगी साथ, एकमेकांना प्रोत्साहन, आठवणींचा गोडवा या साऱ्यांचे शब्दांकन कठीण, पण त्यांचे सार काढून ते ‘अभियांत्रिकी स्पंदने’ या पुस्तकातून मांडले. माझे हे मित्र माझ्या व्यक्तिमत्त्वाचे भाग आहेत. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या प्रेमळ धाग्यात आम्ही बांधले गेले आहोत. आयुष्यातील अनेक धाडसी निर्णय मी यांच्या प्रोत्साहनामुळे आणि भक्कम पाठींब्यामुळे घेवू शकलो. अनेक संकल्पनांना मूर्त स्वरूप देवू शकलो. ते या पुस्तकाचा भाग आहेत. 

Social and Educational Entrepreneur असलेले आमचे मित्र डॉ. भरत अमळकर हे यशस्वी उद्योजक आहेत. केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. Maharastra State Board of Technical Education, Mumbai वर Governing Coucil Member आहेत. याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे.

कुशाग्र बुद्धी लाभलेले, VJTI या नामांकित संस्थेतून B E Production पदवी प्राप्त केलले, काही काळ सक्रिय राजकारणात राहून तेथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले, आध्यात्मिक वृत्तीचे आमचे उद्योजक मित्र श्री सुनील बढे यांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबई, त्यानंतर SSBT College of Engineering and Technology, Jalgaon आणि गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोल हा प्रवास आम्ही सोबत केला.

कृतज्ञता भावाने, मी मित्रांना व विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या शिक्षण विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सौ. हेमाताई अमळकर यांना हे पुस्तक भेट दिले. 

उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल ठेवून, काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यावरून आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थ्याने, चिन्मय अमळकरने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

स्पंदनांचे दस्तऐवजीकरण झाले!

तो एक आनंदोत्सव झाला! 

तो एक मैत्रीचा सोहळा झाला!!

Tuesday, July 22, 2025

आत्मसन्मान !

 आत्मसन्मान!

‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा !’ या पुस्तकाचे ‘लेखन’ सुरू आहे. खरं म्हणजे लॅपटॉप वर ‘टाइपिंग’ आणि मोबाईल वर ‘स्पीकिंग’ सुरू आहे. मोबाईलवर बोललो की ते टाईप होते. पुण्याला असतो तेव्हा शिवार गार्डन परिसरातील, Vision Flora च्या प्रशस्त लॉबी मधे खुर्चीवर बसून, रस्त्यावरची रहदारी न्याहाळत, येवलेंच्या चहांचा आस्वाद घेत, मोबाईल वर सहजपणे जे सुचते त्यास अनुसरून काही वाक्ये लिहतो. हे लेखन नंतर लॅपटॉप वर कॉपी किंवा ट्रान्सफर करतो. जळगांवला असतो तेव्हा ‘भाऊंच्या उद्यानात’ सकाळी ट्रॅक वर फिरतांना मोबाईल वर बोलतो…लिहतो. घरी लॅपटॉप आणि बाहेर मोबाईल असे खऱ्या अर्थाने हे ‘मोबाईल’ लिखाण आहे. प्रकल्प स्वरूपात हे सुरू आहे.

पुस्तक लेखनाच्या निमित्ताने, आता मी Digital World मधे प्रवेश केलेला आहे! त्या निमित्ताने Web Developing, Graphic Desigining, Podcast, Talk Show, Social Media Management या क्षेत्रातील लोकांशी संपर्क येत आहे. मला नवीन गोष्टी शिकायला, समजून घ्यायला आणि करायला आवडतात. सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी या करिता अनेक वर्षांपासून जाणीव पूर्वक प्रयत्न करीत असल्याने, या क्षेत्रातील लोकांसमोर नवीन कल्पना मांडून त्याप्रमाणे काही गोष्टी त्यांच्या कडून करून घेतो. काही स्वतः करतो. पाऊल ठेवले तेथे आजही ठसा उमटतो ही परमेश्वराची कृपा!

काल मी, ‘अविरत प्रयत्नांती, सदाचरणाने आणि परमेश्वराच्या कृपेने जबाबदारीच्या पदावर पोहोलेली व्यक्ती जेव्हा त्या पदाची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडते तेव्हा ती आत्मसन्मानास पात्र ठरते.’ असा Quote लिहला. Canva चा उपयोग करून, हवे ते बॅक ग्राउंड निवडून त्याचा  flyer बनविला. Instagram वर अजय-अतुल व अजय गोगावले आणि मुकेश पाटील यांच्या अत्यंत प्रेरणादायी महाराष्ट्र गीतांचा उपयोग करून त्याचे रील बनविले. ते Insta आणि Fb वर अपलोड केले. स्टेटस ही ठेवला. तो अनेकांना आवडला. त्यांनी 👍 करुन लाईक केले. त्यांना मी धन्यवाद दिले. 

काहींनी व्हॉट्सअप वर, ‘खूप creative visual representation आहे.’ 

‘Quote आणि Visual  फार परिणाम कारक आहे.’

या सारखे अभिप्राय पाठविले. 

अभिप्राय लिहलेल्यांना सहज म्हणून आणि connectivity असावी व्हावी म्हणून मी धन्यवाद देतानाच, 

‘या व्यक्तीला आत्मसन्मानास पात्र कोण ठरविते?’ 

Answer the Question 

And get the Mint !

असे लिहून पाठविले.

अजून पर्यंत कोणी Mint क्लेम केलेले नाही!

Sunday, July 20, 2025

अर्पण !

 उत्तर भारतीय श्रावण मास सुरू झाला आहे.

मराठी श्रावणाची आम्ही वाट पाहत आहोत.

येत्या सहा सात दिवसात तोही सुरू होईल. 

या पावन पर्वावर, पत्नी सोबत मी ओंकारेश्वर मंदिरात आलो आहे. 

मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई केली आसल्याने, संध्याकाळच्या शांततेत मंदिर परिसर दिव्य प्रकाशाने न्हालेला आहे.

संध्या आरती नुकतीच संपली आहे. 

पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. 

वातावरणात प्रसन्नता आणि मंदीर परिसरात चैतन्य जाणवते आहे. 

मंद वाऱ्याचा झोत देवस्थानचा सगुण साकार स्पर्श हृदयापर्यंत पोहचवत आहे. 

माझ्याकरिता ओंकारेश्वर मंदिर श्रद्धास्थान आणि ऊर्जेचा स्त्रोत !

पंडितजींनी तिलक केल्यानंतर, साकार निराकार स्वरूपातील श्री शिवशंकर आणि माँ पर्वती यांचे समवेत विराजमान असलेल्या श्री गणेशांच्या चरणी माझे पुस्तक अर्पण करीत आहे.


महेंद्र इंगळे, जळगाव 

जुलै १९, २०२५

Saturday, July 19, 2025

लिहले !

छोट्या मधुरा सोबत रील केले.

ते तुम्हाला आवडले.

सहज म्हणून फेस बुक वर पोस्ट लिहली.

ती तुम्हाला आवडली.

आणखी लिहा म्हटले.

लिहले.

मग तुम्ही ब्लॉग लिहा म्हटले. 

Blogger वर लिहले. त्याचे नियम पाळून लिहले. 

ते ही तुम्हाला आवडले.

आणखी लिहा म्हटले. आणखी लिहले.

जगभरात अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असलेले सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे साडेचार हजार माजी विद्यार्थी  LinkedIn वर आहेत. LinkedIn वर लिहा म्हटले. तेथे लिहले. 

लिहत राहा म्हटले. लिहत राहीलो. 

जगभरातील मान्यवर जेथे महत्वाच्या विषयांवर नावीन्यपूर्ण पद्धतीने लिहतात त्या Medium वर लिहा म्हटले. तेथे लिहले. Leadeship, Decision Making, Need for Achievement, Psyche या विषयांवर लिहले. आणखी वेगळ्या विषयांवर लिहले. नाविन्यपूर्ण पद्धतीने लिहले. अंतःप्रेरणेने लिहले. परमेश्वराच्या कृपेने लिहले.

जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या मोठ्या व्यक्तींना, कुठलाही डेटा उपलब्ध नसताना, ऐतिहासिक महत्वाचे निर्णय घेत असताना उपयुक्त ठरू शकेल असे Decision Making चे Model सादर केले.

हे सर्व इंग्रजीत लिहले.

मराठीत लिहा म्हटले.

मराठीत लिहले.

व्यवस्थापन शास्त्रातील (Management) अनेक महत्वाच्या संकल्पनांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, त्यांना अनुसरून, प्रसंगांचा, घटनांचा उल्लेख करून गोष्टी रूपाने लिहले.

ते कॅलिडोस्कोप सारखे झाले. काहींना ते स्मरणरंजन तर काहींना प्रेरणादायी वाटले. पण सर्वांना आवडले.

पुस्तक लिहा म्हटले.

ते लिहले.

आणखी लिहा म्हणत आहेत.

आणखी लिहत आहे.

वेब साइट सुरू करा म्हटले. www पेक्षा https ही वेबसाइट अधिक secured आणि latest trend ची आहे म्हणून ती सुरू करा म्हटले.

तसे केले.

https://mahendraingale.com 

या नावाने ती सुरू केली.

प्रक्रियेचा आनंद घेत आहे.

तो तुम्हालाही मिळावा म्हणून लिहले.

Tuesday, July 15, 2025

संवेदनशीलता !

संवेदनशीलता !

भाऊच्या उद्यानात, दत्त मंदिरा समोरील बाजूने पाण्याच्या टाकीजवळील बाकावर बसून, मी मंदिरासमोरील कारंज्यांकडे बघत आहे. कारंज्यातून उसळी घेणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या तुषारांमुळे बाहेरच्यापेक्षा वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हे तुषार खाली येवून पॉंड मधील कमलदलांवर पडत आहेत. सकाळी असते त्यापेक्षा माणसांची वर्दळ कमी आहे. 

समोर पौर्तुगीज वास्तूशैलीतील, ‘भाऊचे उद्यान’ या सोनेरी अक्षरांनी सुशोभित भव्य प्रवेशद्वार, त्याच शैलीत निर्माण केलेला उंच खांब व त्यावरील घड्याळ दिसत आहे. घड्याळाचा लहान काटा ७ वर आणि मोठा ६ वर आहे.

ओंकारेश्वर मंदिरातून थोड्या वेळा पूर्वी मी उद्यानात आलो.  ट्रॅक वर चालत असतांना, ‘ये कांहा आ गये हम ….’ हे स्वर कानावर पडताच पावले थांबली. पाथ वे वरील स्टँडिंग स्पीकर जवळ जाऊन, ते मी अधिक लक्षपूर्वक ऐकू लागलो. काही क्षणानंतर  ‘तुम यही हो …यही कही हो …’ हे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील शब्द ऐकताच संवेदनांचा झरा वाहू लागला.

आता मी असे थांबू शकतो. पाहिजे तेव्हढा वेळ थांबू शकतो. त्याकरिता मी स्वतंत्र आहे. पूर्वी असे नव्हते.

मुंबईत असताना ‘गॅलेक्सी-गैटी’ मधे ‘सिलसिला’ बघितला होता. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या संवेदना प्रगटल्या आणि आता निर्माण झालेल्या संवेदनांमधे मिसळून गेल्या. त्यातून नवीन संवेदना निर्माण झाल्या. या संवेदना माझ्यात नेमका कोणता भाव निर्माण करीत आहेत याचा मी विचार करू लागलो.

संवेदना कशा निर्माण होतात, त्या कशा निर्माण करता येवू शकतात याचा विचार करत असताना, छत्रपती संभाजी नगर येथे Capacity Building या प्रशिक्षण कार्यक्रमात, प्रशिक्षणार्थींमध्ये संवेदना (Sensation) निर्माण करण्याकरिता, सुदान मधील दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या, मार्च १९९३ मधे न्यूयॉर्क टाइम्स मधे प्रसिद्ध झालेल्या, एका फोटोचा वापर मी केला होता याची मला आठवण झाली. 

व्यक्ती संवेदनशील असल्यास तिची कार्यक्षमता वाढते अशी माझी धरणा आहे. अलीकडे, माझ्या भाषणात आणि लेखनात, संवेदनशील हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरला आहे.

Monday, July 14, 2025

Great Author!

Great Author!

आज प्राचार्य एम एस महाजन सरांना भेटलो.

सरांचे, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे असताना, १९८६ मधे, जेव्हा Statistical Quality Control हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ती आम्हा सर्वांकरिता अभिमानाची गोष्ट ठरली होती. धनपत राय सारख्या नामांकित पब्लिशरनी हे पुस्तक प्रकाशित केले होते. देशातील जवळ जवळ सर्व विद्यापीठात आणि प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांत विद्यार्थी आणि प्राध्यापक हे पुस्तक वापरत होते. 

प्रकाशकांच्या आग्रहानुसार, सरांनी १९८२ मधे हे पुस्तक लिहायला सुरवात केली. Statistical Quality Control या विषयातील जागतिक स्तरावर मान्यता असलेले तज्ञ Eugene Grant यांनी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले Grant हे सरांचे आदर्श होते. परंतु त्यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांनाच काय प्राध्यापकांनाही समजायला अवघड जायचे!

केरळ राज्यातील त्रिचूर येथे Total Quality Management  (TQM) या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. महाजन सर सहभागी झाले असताना, प्रशिक्षण देणारे प्रा. राघवेंद्र यांना श्री महाजन यांचे कार्यक्रमात लक्ष नाही असे समजून त्यांना एक प्रश्न विचारला. महाजन सरांचे खरोखर लक्ष नव्हते. परंतु समयसूचकता बाळगून,  त्यांनी बोर्डवर लिहलेले काही शब्द बघून त्या अनुषंगाने बोलायला सुरवात केली. ५/७ मिनिट ते बोलत होते. प्रा. राघवेंद्र आश्चर्य चकित होऊन म्हणाले, “यातील बराचसा भाग अजून शिकवायचा आहे, मिस्टर महाजन!”.  तेव्हा प्रा. धनोकरांनी सांगितले, ‘सर, ‘Statistical Quality Control’ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रा राघवेंद्रांनी त्यांना नाव विचारले. नाव ऐकल्यानंतर, “या विषया करिता मी तुमचेच पुस्तक  वापरत असतो.”, असे ते म्हणाले.

या सारखे अनेक अनुभव सरांनी सांगितले. Author होण्याचे काय फायदे असतात तेही सांगितले. अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभल्याने, मलाही ते मिळतील हा विचार माझ्या मनात आला!

Sunday, July 13, 2025

सहकारी, मी आणि प्रशासनाचा आरसा !

सहकारी, मी आणि  प्रशासनाचा आरसा !

काल श्री सुरेश गोस्वामींशी बोललो. ते माझे लेखन आवर्जून वाचतात. शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे ते प्रबंधक म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या ४० वर्षाच्या सेवेत, त्यांना तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकुण १६ प्राचार्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यातील काहींची गुण वैशिष्ट्ये त्यांनी मला सांगितली. गुणग्राहकतेचा त्यांचा हा पैलू मला नव्याने समजला!

इक्विपमेंट मशीनरी पुरविणारे, सिक्युरिटी सर्विसेस व सफाई कामगार पुरविणारे कंत्राटदार, बांधकाम कंत्राटदार, विविध सेवा पुरविणारे पुरवठादार, ‘ग्रांट आली का, बिले कधी निघणार’ याची चौकशी करायला संस्थेत यायचे. यासंबंधातील सर्व माहीती, पत्रव्यवहार संबंधितांना दाखवून ग्रांट उपलब्ध झाल्यावर त्वरित बिले काढण्यात येतील असे सांगुन त्यांना आश्वस्त करण्याची जबाबदारी मी श्री गोस्वामी यांच्याकडे सोपविली होती. ते, ती उत्तमरित्या  पार  पाडत असत म्हणुन  माझ्या पर्यंत कोणी लोक येत नसत. ते या लोकांशी अतिशय सौजन्याने वागायचे आणि त्यांना चहा पाजायचे. कंत्राटदारांना चहा पाजणारे अधिकारी म्हणून मी त्यांचा अनेकदा उल्लेख करायचो. अभ्यागतांच्या  चहापाना वरील खर्च म्हणुन, त्यांना हा कार्यालयीन खर्च म्हणून दाखविता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही.

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव ही मोठी संस्था. येथे सहा अभियांत्रिकी शाखा आणि फार्मसी शाखा आहे. शासकीय तंत्रनिकेतन, मुक्ताईनगर या संस्थेच्या प्राचार्य पदाचाही कार्यभार माझ्याकडे होता. कामात सुलभता यावी म्हणून प्रा पी पी गडे यांचेकडे, मुक्ताईनगर तंत्रनिकेतना संबंधातील कामकाजा करिता समन्वयकाची जबाबदारी सोपविली होती. ते, ती इतक्या उत्तमरित्या पार पाडत होते की मंत्रालयातील अल्प संख्यांक विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी परस्पर संपर्क करून माहिती घ्यायचे आणि काही निर्देश द्यायचे. त्यानुसार त्वरित अंमल बजावणी केली जायची.  बांधकाम प्रगती अहवाल (Progress Report) तयार करताना स्थापत्य विभाग व सार्वजनिक बांधकाम  विभागा  सोबत समन्वय करणे, ग्रँटची मागणी करताना, मागील निधी पूर्णपणे खर्च झाला आहे, त्यासंबंधीचे विवरण असलेले प्रमाणपत्र -Utilisation Certificate (UC) तयार करण्याकरिता लेखा विभागा बरोबर समन्वय करणे या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडायचे.

मुक्ताई नगर तंत्रनिकेतन संस्थेच्या बांधकाम शीर्षा (Head) खाली ४ कोटी रुपये प्राचार्यांच्या खात्यात जमा होताच मी लेखा विभागाला त्वरीत चेक लिहायला सांगितले. स्वाक्षरी करून, प्रा गडे यांचे हस्ते पुढील प्रक्रिये करिता तो ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला. कंत्राटदारांना हे माहीत झाल्यावर ते संस्थेत आले. आभार व्यक्त करायचे म्हणून भेटी करिता चिठ्ठी पाठविली. ‘तुमचे आभार पोहचले. भेटीची आवश्यकता नाही. ते शासकिय काम होते आणि माझे कर्तव्य होते’, असे मी त्यांना कळविले.  त्यावेळेस, गेल्या अनेक वर्षांपासून, १५ सप्टेंबर रोजी, मी ज्यांच्या चरित्राविषयी बोलत आलो आहे आणि ज्यांच्या कर्तव्यनिष्ठे  संबंधातील ‘दोन मेणबत्त्यांची गोष्ट’ मी सांगत आलो आहे ते महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरय्या माझ्या समोर उभे आहेत असे मला वाटले!

कळशीतील पाणी!

कळशीतील पाणी!

तापी- पूर्णा नद्यांच्या संगमा ठिकाणी, किनाऱ्यावर उभा राहून मी अथांग जलाशयाकडे बघत आहे. सेंद्रिय गवतावर माझे पाय भिजले आहेत. हातात कळशी आहे. नुकताच पाऊस कोसळून गेला आहे. आकाश निरभ्र झाले असून सभोवतालच्या परिसराला झळाळी अली आहे आणि वातावरण चैतन्याने भरून गेले आहे. वातावरणात गारवा आहे. पक्षी त्यांच्या पंखांनी पाणी झटकत, झाडांच्या फांद्यांवर विसावा शोधत  आहेत. नावाड्यांनी होड्या सोडायला सुरवात केली आहे. तराफ्यांवर बसून, प्रवाहात खोलवर जाऊन, भोई जाळे फेकत आहेत. 

काही तरुण तरुणी नद्यांना आलेले पूर बघत, पनघटावर हास्य विनोदात मग्न आहेत. वटेश्वर मंदिराच्या शेजारी निंब आणि पिंपळ एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे आहेत. त्यांच्या पारावर बसून भाविक  मंडळी भजने म्हणत हरी नामात तल्लीन झाली आहेत. त्यांचे स्वर चांगदेव मंदिरच्या गाभाऱ्यातील मंत्रोच्च्यारांशी समरस झाले आहेत. मंदिरात, संत व साधू अभिषेकाच्या पवित्रतेत लीन झाले आहेत.


हातातील कळशी प्रवाहात बुडऊन भरून घ्यावी. नदी पात्राकडून मंदिराकडे जाणाऱ्या पनघाटवरील पायऱ्यांवरून चढून, वटेश्वर महादेवावर जल अभिषेक करावा, नंतर पनघटा वरील तरुण तरुणींना आणि पारावर बसलेल्या भाविकांना, ते तहानले असतील तर कळशीतील पाणी द्यावें असा विचार मझ्या मानात आला!

Friday, July 11, 2025

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

माझ्या लेखनाला आपल्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. यात केवळ कौतुक नाही तर एक आत्मीयता आहे जी माझ्या अंतरंगाला स्पर्शून नवीन स्पंदने निर्माण करते. 

मागील ब्लॉगमध्ये मी ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा!’ या नव्या पुस्तक लेखनाचा संकल्प जाहीर केला होता आणि त्यामागची पार्श्वभूमीही उलगडली होती. गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून, या पुस्तकाच्या लेखनास औपचारिक सुरुवात केली आहे. 

या ग्रंथाच्या माध्यमातून मी शासकीय सेवेतील संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकार्‍यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दर्शन घडविणार आहे. विविध घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून प्रशासनातील अनेक पैलू आपोआपच उलगडले जातील. कामानिमित्त माझा संबंध आला आणि ज्यांची कार्यशैली मला जवळून बघता आली अशा अनेक कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांबद्दल मी लिहणार आहे. साधेपणाच्या तेजाने झळकणारे, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी मा. सीताराम कुंटेएखादा प्रकल्प हातात घेतल्यावर देहभान विसरून त्यात स्वतःला झोकून देणारे, प्रतिभाशाली व कलावंत मनाचे मा. मनुकूमार श्रीवास्तव;  दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल उत्पादनात लक्षणियरीत्या वाढ करण्यात योगदान देणारे पहिले Inspector General of Registration (IGR) मा. नितीन करीर यांच्याबद्दल लिहणार आहे. या अधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले. सेवा संस्काराचा वारसा लाभलेले, निःस्पृहतेने काम करणारे मा. भूषण गगरणीअत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मा. प्रविण परदेशी यांच्याबद्दल लिहणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनात विविध ठिकाणी कार्यरत राहिलेले, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे प्राचार्य डॉ एन टी खोब्रागडेसहसंचालक पदावर कार्यरत राहिलेले, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केलेले प्राचार्य मा डी पी नाठे;  सहकाऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेणारे व तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेले प्राचार्य एम एस महाजन यांच्याविषयी लिहणार आहे. 

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 'कार्य संस्कृती अभियान' आणि 'पगारात भागवा' हे प्रकल्प राबवितांना जीवाचे रान करून, पायला भिंगरी लाऊन वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या, शेवटच्या श्वासपर्यंत अधिकाऱ्यांच्या कल्याणा करिता झटणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस राहिलेल्या मा. ग दि कुलथे यांच्या बद्दल लिहणे ही माझ्या कडून त्यांना विनम्र आदरांजली ठरेल. 

संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकभिमुखता केंद्रस्थानी ठेवून जेव्हा प्रशासन चालते तेव्हा लोक कल्याणाचे दरवाजे उघडले जातात. शासकीय सेवेत सन्मानाने जगणारे अधिकारी हे समाजाच्या आशा आकांक्षांची पुर्ती करणारी शक्ती असतात. अशा अधिकार्‍यांच्या कार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होते. एक उच्च दर्जाचे मूल्याधिष्ठित आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. इतिहासात त्यांच्या कार्य कर्तृत्वाची नोंद होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरतात. 

या सर्व प्रेरक व्यक्तिमत्वांकडून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या अनुभवांनी माझ्या विचारांना दिशा दिली. त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव ठेवून मी हे लिहणार आहे.

Thursday, July 10, 2025

धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

 धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

आज एका कार्यक्रमानिमित्त धुळे येथे जाण्याचा योग आला. त्या निमित्ताने शासकीय तंत्रनिकेतन, धुळे या माझ्या सेवास्थळी सदिच्छा भेट देण्याचा मनोदय पूर्ण झाला. या संस्थेत मी १९८९ साली अधिव्याख्याता म्हणून आणि २०१५ साली प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्या काळातील आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या.

संस्थेचे  प्राचार्य डॉ. आर. जी. वाडेकर यांच्या पुढाकाराने नवीन इमारतीचे बांधकाम आणि अंतर्गत रस्त्यांचे काम वेगाने सुरू असल्याचे पाहून समाधान वाटले. पांझरा नदीच्या किनाऱ्याने, संस्थेच्या बाजूने, राष्ट्रीय महामार्गापासून शहरात जाणारा चार पदरी रस्ता पूर्ण झाल्यामुळे संस्थेपर्यंतचा प्रवास आता अधिक सुलभ झाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आज ऑप्शन फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असल्याने संस्थेच्या परिसरात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवली. प्रवेश प्रक्रियेला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

कार्यालयातील कर्मचारीवर्ग व प्राध्यापकांशी संवाद साधताना मन आनंदित झाले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या शुभेच्छा मनाला भावून गेल्या. मी कार्यरत असताना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

माझे ‘अभियांत्रिकी स्पंदने’ हे पुस्तक मी संस्थेला भेट म्हणून अर्पण केले. माझ्या आठवणी, अनुभव आणि विचार पुन्हा एकदा त्या वास्तूत गुंजले आणि नवीन स्पंदने निर्माण झाली !

Monday, July 7, 2025

कृतज्ञता !

कृतज्ञता !

आज संध्याकाळी श्री नंदलाल सापकाळे यांचा फ़ोन आला. ते माझे सहकारी होते. त्यांनी सांगितले की शासकीय अधिकारी राहिलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांनी पनवेल वरून कळविले की त्यांनी माझे पुस्तक वाचले. माझ्या विषयी व पुस्तकाविषयी त्यांचे नातेवाईक जे बोलले ती स्वस्तुती होईल म्हणून मी येथे लिहीत नाही. मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद कळविले. 

यानिमित्ताने एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला.

मी शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे शिकत असतांना मा. शालिग्राम पाटील हे शिपाई म्हणून कार्यरत होते. पुढे मी प्राध्यापक म्हणून कार्यरत असतांनाही ते तेथे होते. नियत वयोमानानुसार ते नंतर निवृत्त झाले. त्यावेळी आम्ही त्यांचा निरोप समारंभ आयोजित करून यथोचित गौरव केला. कार्यक्रमात त्यांच्या पत्नी, मुली व जावई उपस्थित होते.

मी प्राचार्य पदावर कार्यरत असताना एक दिवस त्यांच्या पत्नी व जावई माझ्या कडे आले. तेव्हा त्यांचे निधन झाले होते हे मला कळले. त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन पत्नीस मिळावे म्हणून त्यांच्या पत्नी अर्ज व कागदपत्रे घेवून कोषागारात गेल्या तेव्हा त्या ठिकाणी वारसदार म्हणून पत्नीचे वेगळेच नाव आढळले. कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना ते दाखविले. ‘आमच्याकडे AG Office कडून जे आदेश आले आहेत त्यावर तुमचे नाव नसल्याने आमच्या स्तरावरून काही करता येणार नाही. या संबंधात तुम्हाला AG Office, Mumbai कडे संपर्क साधावा लागेल’ असे कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

‘तुम्हाला काही अडचण आल्यास इंगळे दादांना भेटायचे’. असे काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते, असे त्यांच्या पत्नींनी मला सांगितले. पाटील मला प्रेमाने दादा म्हणायचे. त्यांचा माझ्यावरचा विश्वास पाहून मला गहिवरून आले. 

मी ताबडतोब आस्थापना विभागातील सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे सेवा पुस्तक आणण्याच्या सूचना केल्या. त्याच वेळेस एका महत्वाच्या विषयावर माहिती संकलन करून ती वरिष्ठ कार्यालयामार्फत मंत्रालयात सादर करण्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू होते. त्यांची केस फार जुनी असल्याने, रेकॉर्ड रूम मधून ते शोधून आणणे थोडे अवघड असल्याने श्रीमती पाटील यांना २/३ दिवसांनी येण्यास सांगावे अशी विनंती मला सहकाऱ्यांनी केली. मी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचे काम प्राधान्याने करण्याबद्दल नेहमीच आग्रही असायचो. 

त्याच वेळेस निवृत्त झालेले माझे सहकारी श्री नंदलाल सपकाळे काही कामनिमित्त कार्यालयात आले असल्याचे मला समजले. मी त्यांना बोलावून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणायची विनंती केली, कारण यापूर्वी काही काळ त्यांनी त्या विभागात काम केले होते. ते आनंदाने तयार झाले. त्यांनी परिश्रम घेवून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणले.

सेवा पुस्तकात वारसदार म्हणून त्यांच्या पत्नीचे व्यवहारातील प्रचलित नाव लिहलेले होते. पाटील निवृत्त झाले तेव्हा त्यांनी  स्वतः ते नाव निवृत्ती अर्जावर लिहले होते. आधार कार्ड आणि ऑनलाइन पद्धतीने निवृत्ती अर्ज करण्याची पद्धत तेव्हा अस्तित्वात नव्हती. पाटील यांनी सादर केलेल्या अर्जानुसार AG ऑफिस कडून त्यांची पेंशन ऑर्डर ट्रेझरी कडे गेली होती व त्या नुसार त्यांना पेंशन मिळत होते. 

प्रत्यक्षात त्यांच्या पत्नीचे नाव वेगळे होते. सेवा निवृत्ती आदेशातील नाव आणि श्रीमती पाटील यांच्याकडे  असलेल्या कागद पत्रावर असलेल्या नावाची व्यक्ती एकच आहे हे सिद्ध होऊ शकेल असा कोणताही कागदपत्राचा पुरावा त्या सादर करू शकत नव्हत्या. अशा परिस्थितीत AG office कडे जाऊनही काही उपयोग नव्हता.

मी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी व जेष्ठ विभाग प्रमुखांशी या बाबत चर्चा केली. 

मी, श्रीमती पाटील यांना एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) करायला सांगितले. निवृत्ती वेतन आदेशात असलेल्या नावाची व्यक्ती आणि त्या एकच व्यक्ती आहे अशा आशयाचे ते प्रतिज्ञापत्र असावे हे त्यांना सांगितले. त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र करून आणल्यानंतर मी AG office कडे सविस्तर पणे एक प्रस्ताव सादर केला. त्यात सर्व घटनांची तपशीलवार माहिती दिली. त्याच बरोबर निवृत्ती वेतन आदेशात नमूद असलेल्या व कागदोपत्री असलेल्या व्यक्ती एकच आहेत आणि मी त्यांना प्रत्यक्षरित्या ओळखतो असे त्यात नमूद केले. मी आहरण व संवितरण अधिकारी (Drawing and Disbursing Officer) असल्याने जबाबदारीपूर्वक हे लिहले होते. पंधरा दिवसांनी  श्रीमती पाटील यांच्या नावाचा वारसदार म्हणून उल्लेख असलेला आदेश कोषागारास प्राप्त झाला. 

निवृत्त झाल्या नंतरही श्री सपकाळे यांची आम्हाला जी मदत झाली होती त्या घटनेची, मी त्यांना या निमित्ताने आठवण करून दिली तेव्हा त्यांचा कंठ दाटून आल्याचे मला जाणवले !

माझ्या जीवनात कृतज्ञता या शाश्वत मूल्याला अनन्य साधारण महत्व आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेले असे क्षण जीवंत करून, मी त्यांना शब्दबद्ध करतो तेव्हा त्यापासून मिळणारा आनंद शब्दातीत असतो. कृतज्ञता ही केवळ भावना नसून, ती आत्म्याला स्पर्श करून, हृदयात दिव्य स्पंदने निर्माण करणारी एक अनुभूती असते !


Saturday, July 5, 2025

संकल्प!

 संकल्प !

‘अभियांत्रिकी स्पंदने’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ऑर्डर प्लेस होण्याचा ओघ सुरू झाला आहे. प्रत्येक ऑर्डर डॅशबोर्डवर दिसते आणि त्यासोबत रॉयल्टीचे आकडेही. हे स्प्रेडशीट पाहताना मनात आश्चर्य, समाधान आणि अनाहत आनंद अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या! आणि त्या भावनेतूनच लिहिण्याचं नवं स्फुरण मनात उमटलं.

१९८२ ते १९८९ दरम्यान मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. त्या काळात मॅकग्रा हिल्स, मॅकमिलन, पियर्सन, धनपत राय यांसारख्या नामवंत प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी मला सतत भेटत असत. त्यांनी मला पुस्तक लिहिण्याची विनंती केली होती. मी ‘अप्लाइड मेकॅनिक्स’ हा कठीण समजला जाणारा विषय अत्यंत संयतपणे शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. हेच कारण असेल की प्रकाशन संस्थांच्या सर्वेक्षणातून माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचले.

पण मी ‘Beer and Johnston’ या लेखकद्वयींच्या Engineering Mechanics या पुस्तकाचा अत्यंत चाहता होतो. त्यांनी त्या विषयावर इतकं सुबोध, समर्पक आणि प्रगल्भ लेखन केलं होतं की त्या पातळीवर मी काही लिहू शकतो, हे मला वाटलंच नाही. म्हणून मी नम्रपणे नकार दिला.

नंतर त्यांनी मला Design of Steel Structures या विषयावर लिहिण्याचा आग्रह केला, जो विषय मला अत्यंत प्रिय होता आणि ज्यात बोर्ड परीक्षेत मी सर्वाधिक गुण मिळवले होते. तेव्हा नुकतंच IS 800 चे सुधारित (Revised) संस्करण प्रसिद्ध झालं होतं. त्या विषयावर R. S. Negi यांच्याखेरीज फार मर्यादित प्रमाणात स्रोत उपलब्ध होते. मी त्या वेळी एकाच वेळी चार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना  हा विषय शिकवत होतो आणि त्यामुळे वेळे अभावी, इच्छा असूनही लिखाण शक्य झालं नाही.

२००५ मध्ये मुंबईच्या न्यूझीलंड हॉस्टेल, गोरेगाव येथे झालेल्या राजपत्रित महासंघ अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी अध्यक्ष प्रा. राजनीश पिसे यांच्या सोबत उपस्थित होतो. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात श्री. रविंद्र मोरे (जे नंतर Director of Treasuries झाले) यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि मा. ग. दि. कुलथे यांची सरचिटणीस म्हणून.

दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा व बदली कायद्यावर चर्चासत्र व परिसंवाद झाला. मी त्यात या कायद्याच्या पळवाटा व त्याचा गैरवापर या विषयावर माझे मत मांडले. बदलीच्या कायद्याचे उल्लंघन करून माझी बदली करण्यात आली होती (नंतर ती रद्द झाली). 

शिक्षक संघटनेत, राजपत्रित अधिकारी संघटनेत आणि प्रशासनात काम करतांना माझ्या अनुभावर आधारित “शासकीय सेवेत सन्मानाने जागा!” हे पुस्तक मी लिहायला घेतलं. पण संघटनेच्या कार्यात आणि नंतर प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढा गुंतून गेलो की ते लिहिणं शक्य झाले नाही. आज, ‘अभियांत्रिकी स्पंदने’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या जुन्या स्फुरणाचा नवा जागर होत आहे. आता ठरवलं आहे – लिहीयचं!

"लोकाभिमुख शासन म्हणजे काय? ही एक संकल्पना आहे की वास्तव?"

"शासकीय नोकरी ही ‘सेवा’ आहे का?"

"सन्मान म्हणजे नक्की काय ? तो कोणी कोणाचा करायचा असतो ?"

"जगणं म्हणजे नेमकं काय? जिवंत राहणे आणि जगणे यातील मुलभूत फरक काय आहे?"

या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत मी चिंतन करीत आहे. विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल, तेव्हा ते लेखन पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबायचे नाही असा संकल्प या निमित्ताने करित आहे!

Friday, July 4, 2025

मूठभर बिया !

काल Amazon Link येताच माझ्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी आणि स्नेहीजनांनी पुस्तक order करून, screen shots पाठवायला सुरवात केली. त्यांना धन्यवाद देताना मध्यरात्री नंतरच्या नीरव शांततेत बाहेर आभाळ आणि आत मन भरून आले होते!

निळ्याशार हिरव्या डोंगरावरुन, आषाढातील भरून आलेल्या मेघांकडे बघून, आसमंतात उधळलेल्या, ओंजळीतील मुठभर बियांचे वटवृक्षात रूपांतर होण्याची प्रक्रिया बघून मी आनंदून गेलो आहे!

माझा प्रत्यक्ष परिचय नसतांना, अनेक मान्यवर व्यक्ती व प्रकाशन संस्थानी Google Books वर Sample वाचून सुंदर अभिप्राय लिहिलेत. फोन वर बोललेत.  हे पुस्तक इंग्रजीतून लिहण्याकरिता अनेक जण आग्रह करित आहेत. 🙏

——————————————————————————

आपल्या पुस्तकाची काही पाने वाचली. आपल्यातली अभियांत्रिकी आणि स्पंदने भावली!

तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर लेखन केले आहे.

मंदार जोशी 

ग्रंथपाल, मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय 

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

—————————————————————————-

Great!

Sample वाचले. छान आहेत. तुम्हाला ‘लेटर ऑफ अप्रिसिएशन’ मिळाले कारण पुस्तक खूप छान आहे. आम्ही कॉपी ऑर्डर केली आहे.

दत्तात्रय वाघमोडे 

CEO, Dexcel Digital Hub Pvt. Ltd.

——————————————————————————

Amazon Link: अभियांत्रिकी स्पंदने 

https://www.amazon.in/dp/936554632X/ref=sr_1_1

Google Link:अभियांत्रिकी स्पंदने 

https://play.google.com/store/books/details?id=8TNpEQAAQBAJ

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...